चला नैसर्गिक शेतीकडे
Friday, 15 June 2018
Saturday, 30 December 2017
सुभाष पाळेकर
सुभाष पाळेकर <br>
एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आपल्या परंपरागत शेतीच्या कामातून बाहेर पडून अधिकारी,मोठा राजकारणी,उद्योगपती झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो.पण गावातच राहून शेतावरच शेती विषयक संशोधन करून भारतभर लौकिक,प्रसिद्धी मिळवणारे एकमेव नाव म्हणजे सुभाष पाळेकर.सुभाष पाळेकर देशातील प्रत्येक भागात शिबिराच्या माध्यमातून पोहचले आहेत.अतिशय उदास व हालाखीच्या परिस्थितीत असलेला शेतकरी राजा सुद्धा आपली पूर्ण शक्ति लावून त्यांचे प्रयोग आपल्या शेती मध्ये करून पहात आहे.पाळेकर यांची प्रसिद्धी पाहून आता हळुहळु त्यांच्या कार्याची दखल मीडिया,NGO,आध्यात्मिक संस्था तसेच राज्य व केंद्र सरकार घेत आहेत.कित्येक देशभक्त,समाजसुधारक,अध्यात्मिक जाणीव असलेले लोक या कार्याच्या प्रचारासाठी पुढे येत आहेत.या कार्याच्या 100% सफलतेसाठी आणखी काही देशभक्त,सामाजिक जाणीव जपनार्या बांधवाची आवश्यकता आहे.
चला जंगलात फिरायला
चला आज आपण एका घनदाट जंगलात फिरायला जाऊ.कडक उन्हाळ्याच्या दिवसात जंगलामध्ये आपल्याला मोठ मोठी झाडं झुडपे वेली दिसत आहेत.वेगवेगळ्या प्रकारचे कीड़े मुंग्या प्राणी पक्षी आपल्याला दिसत आहेत.वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज आपल्या कानावर पडत आहेत.मानवी वस्तीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या जंगलात प्राणी पक्षी वेली झाडं अगदी आनंदात रहात आहेत.21 व्या शतकातही आपण मानवा पासून सुरक्षित आहोत याचा जणू ते आनंदच साजरा करतायत असं वाटत आहे.प्रत्येक झाडांची आकार उंची प्रचंड मोठी आहे.मोठ मोठ्या झाडांच्या खाली असलेल्या झुडपावर पसरलेल्या फळांनी फुलांनी बहरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेली दिसत आहेत.कडक उन्हाळ्यात 8 महिन्यापासून एकही पावसाचा थेंब न पडलेल्या या जंगलात अगदी लहान लहान रोप सुद्धा जोमात वाढत आहेत.वेली,झाडं फळा फुलांनी गच्च भरलेली आहेत.चक्क 8 महिन्यापासून या जंगलात पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही असं अजिबातच वाटत नाही.हजारो वर्षापासून या जंगलांने कित्येक सतत 2-3 वर्षाचे दुष्काळ,पूर,चक्रीवादळ पाहिले आहेत तरीही हे जंगल आपले अस्तित्व टिकवून आहे.असल्या संकटातही येथील प्राणी पक्षी कीटक वेली झाडं झुडपे आपल्या जाती प्रजातीचे अस्तित्व टिकवून आहेत.लाखो ताकतवर प्राणी पक्षी आणि झाडामध्ये सुद्धा येथील छोटे छोटे कीटक प्राणी पक्षी वेली वनस्पति आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत.मित्रांनो ....या जंगलात फिरताना आपल्याला खूप त्रास झाला पण मित्रांनो काळजी करू नका सरकार करोडो रुपये खर्च करून येथे लवकरच पर्यटन क्षेत्र विकसित करणार आहे .जेंव्हा आपण परत या सुंदर जंगलात येऊ तेंव्हा येथे चांगले रस्ते रेस्टॉरंट होटेल्स असतील आणि शहरातील हजारो लोकांना शुद्ध हवा आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद येथे घेता येईल.त्यातून रोजगार वृद्धि होईल आणि येथे शुध्द हवेत तुम्हाला तुमचं सुंदर घर देखील घेता येईल.फ़क्त या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्या खिशात भरपूर पैसे हवेत.
नैसर्गिक खेती - कविता
*नेचुरल फार्मिंग है वक्त की जरूरत।*
*अभी नहीं समझोगे तो होगी मुसीबत ॥*
*अब तक जो हमने किया वो थी अनजाने में की भूल ।*
*सब कुछ समझ कर भी जहर बांटोगे तो सजा मिलेगी भरपूर ॥*
*इसी तरह से जो जीव जल-जंगल-जमीन को लुटाते जाओगे ।*
*आने वाली मुसीबतों को आधुनिक तकनीक से नहीं संभाल पाओगे ॥*
*आधुनिक विज्ञान को प्रकृति संवारने में ना लगाओगे।*
*भविष्य में तुम मिट कर रहे जाओगे ॥*
*क्या पढ़ लिख कर तू भी विज्ञान को प्रकृति के विनाश में लगाएगा ।*
*आने वाले पैसों से क्या साफ हवा-पानी खरीद पायेगा ॥*
*माना कि यह तेरे अकेले बस की बात नहीं।*
*प्रकृति के चाहने वालों से जुड़ जा फिर विनाशकारियों की कोई औकात नहीं ॥*
*प्रकृति को मिटाकर तुम क्या अपने बच्चों का हित कर पाओगे ।*
*क्या दौलत से तुम स्वस्थ जीवन जंगल जमीन खरीद पाओगे ॥*
🌱 #चलानैसर्गिकशेतीकडे 🌱
फायद्याची गव्हाची शेती-बन्सी गहू
सुवर्णसंधी,सुवर्णसंधी,सुवर्णसंधी
शेतकरी मित्रांनो,या रब्बी हंगामात बंसी जातीच्या गव्हाची पेरणी करा आणि लाखो रुपये कमवा.बंसी जातीच्या गव्हाला भरपूर मागणी आहे त्यामुळेच हा गहू 40 रुपयांपासून 100 रुपयापर्यंत विकला जातो.या गव्हाचे एकरी 12-18 क्विन्टल पर्यंत उत्पादन होते. 40 च्या दराने 15 क्विंटलचे 60000 रुपये होतात.गव्हाच्या चवीचे व औषधीय गुणांचे महत्व तुमचे आजी आजोबा सांगू शकतील.या गव्हाची पोळी 2-3 दिवस दसमी सारखी नरम रहाते.आणि या गव्हाच्या पोळीला भाजी नसतानाही फ़क्त पोळी खाऊनही स्वादिष्ट चव मिळते.बंसी गहू फ़क्त 3-5 पाण्यात येतो.हा गहू जोरदार वादळात खाली पडला तरी दुसऱ्या दिवशी परत उभा रहातो.याची ओम्बी छोटी व गच्च असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे हा गहू खराब होत नाही.
दुसरीकडे रासायनिक गहू करने परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी गहू पिकवणे सोडून दिले आहे.फ़क्त घरी खाण्यासाठी शेतकरी गहू पिकवत आहे.तेंव्हा शेतकरी मित्रांनो या रब्बी हंगामात अर्धा एकर तरी नैसर्गिक बंसी गहू पिकवून पहा.कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका.पहिल्याच वर्षी नैसर्गिक शेतीत भरपूर उत्पादन मिळते.आणि हो ......कधी आपली भेट झाली तर वरण पोळी खाऊ घाला.😃😃
कीड येण्याची कारणे ?
शेतकरी मित्रांनो ,
सध्या शेतकऱ्यांसमोर असणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पिकांवर पडणारे रोग,कीड आहे.सध्याच्या रासायनिक शेती पद्धतीमुळे दिवसेंदिवस पिकांमधील प्रतिकार क्षमता कमी होत आहे.आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत आहे.आज शेतकरी कीड व रोगांसाठी वातावरणाला जबाबदार धरतो.पण याचे मूळ दुसऱ्याच गोष्टींमध्ये सामावलेले आहे.कीड व रोग येण्याची कारणे ------
1.बियाणे----
सर्वात महत्त्वाचे कीड व रोग येण्याचे कारण म्हणजे संकरित बियाणे आहे. संकरित बियाण्यांची निर्मिती शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर उद्योगांच्या हितासाठी करण्यात आली आहे.गावरान बियाणे हे स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणारे असते. गावरान बियाणे वादळ, कमी जास्त पाऊस ,कडक ऊन, थंडी अशा सर्वच वातावरणात टिकाव धरून राहते.
2. रासायनिक खते---
रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत जाते. जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे पिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात कीड येते.
3.कीटक नाशक --- मित्रांनो आपल्या शेतात निसर्गाची एक अद्भुत संरक्षक यंत्रणा आहे म्हणजे आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाने योजना तयार केली आहे. आपण अशी योजना जंगलामध्ये पाहू शकतो. जंगलात झाडे निरोगी व फळाफुलांनी बहरलेली दिसतात. तिथे तर कोणीही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली नाही.मग तेथील फळांवर रोग का आढळत नाही. याला कारण आहे तेथील मित्र कीटक, निसर्गात 80% कीटक हे मांसाहारी आहेत म्हणजे ते शाकाहारी कीटकांना खातात. म्हणजे आपल्या पिकाला फक्त निसर्गातील 20% कीटक हानी पोहोचवतात व उरलेले 80% कीटक या शाकाहारी कीटकांना खातात.विशेष म्हणजे मांसाहारी कीटकांचे प्रमाण निसर्गात खूप जास्त आहे. आपण जेव्हा रासायनिक कीटकनाशक फवारतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर मित्र कीटक मारले जातात आणि निसर्गात असमतोल निर्माण होतो.यामुळे मोठ्या प्रमाणात शाकाहारी कीटकांची वाढ होते म्हणजे रासायनिक कीटकनाशकांमुळेच शेतांमधील किडींची संख्या वाढते.
4.पाणी ----
रासायनिक शेतीत पिकाला मुळी जवळ भरपूर पाणी दिले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोग येतात .
5.अंतर ---
अधिक उत्पन्न काढण्याच्या लालसेने व तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक शेतीत कमीत कमी जागेत जास्त झाडे लावली जातात यामुळे झाडाची वाढ व विकास व्यवस्थित होत नाही.झाडांना आवश्यक पोषक तत्त्व,सूर्यप्रकाश मिळत नाही.याउलट नैसर्गिक शेतीत रासायनिक शेतीपेक्षा दुप्पट ते तिप्पट अंतर जास्त ठेवले जाते व आतल्या जागेत आंतरपिके घेतली जातात.यामुळे पिकांना आवश्यक सूर्यप्रकाश,हवा,पाणी ,पोषकतत्त्व अगदी पुरेपूर मिळतात. अशी झाडे कुठल्याही परिस्थितीत निरोगी व मजबूतपणे टिकून रहातात.
6.एकपिक पद्धती ---
निसर्गात बरीचशी सापळा पिके कीटकांपासून झाडाचे रक्षण करतात.वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळे कीटक बसत असतात.आंतरपिकांमुळे काही ठराविक प्रकारचे कीटक आपण पिकावर येण्यापासून वाचवू शकतो.
चिंतामुक्त,आत्महत्या मुक्त ,निरोगी जीवनाचा पर्याय म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेती हाच आहे .
नैसर्गिक ऊस उत्पादनाचे गणित
*नैसर्गिक ऊस उत्पादनाचे गणित*
33×33 म्हणजे एक गुंठा,40 गुंठ्याचा एक एक्कर
33×33×40=43560 स्क्वेअर फूट म्हणजे एक एक्कर
आता 43560 स्क्वेअर फूट म्हणजे एक एक्कर.
आता जर आपण 8×2 वर एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड केली तर
एका एकरात 43560÷16=2722
*म्हणजे एका एकरात 2722 रोपांची लागवड होईल.*
प्रत्येक डोळ्याला जर सरासरी 15 फुटवे फुटले तर
2722×15=40830
*म्हणजे एका एकरात एकूण 40830 ऊस होतील.*
*जर प्रत्येक ऊस 2 किलोचा धरला तर*
40830×2=81660
म्हणजे एका एकरात आपल्याला 81660 किलो उसाचे उत्पादन होईल. *म्हणजे एका एकरात 80 टन ऊसाचे उत्पादन होईल.*
आणि या गोष्टी सहज शक्य आहेत.
*आंतरपिकांचे भरपूर उत्पादन आणि एकरी 80 टन उत्पादन म्हणजे पैसाच पैसा होईल.*
https://youtu.be/1KzyTmINriQ