सुभाष पाळेकर <br>
एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आपल्या परंपरागत शेतीच्या कामातून बाहेर पडून अधिकारी,मोठा राजकारणी,उद्योगपती झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो.पण गावातच राहून शेतावरच शेती विषयक संशोधन करून भारतभर लौकिक,प्रसिद्धी मिळवणारे एकमेव नाव म्हणजे सुभाष पाळेकर.सुभाष पाळेकर देशातील प्रत्येक भागात शिबिराच्या माध्यमातून पोहचले आहेत.अतिशय उदास व हालाखीच्या परिस्थितीत असलेला शेतकरी राजा सुद्धा आपली पूर्ण शक्ति लावून त्यांचे प्रयोग आपल्या शेती मध्ये करून पहात आहे.पाळेकर यांची प्रसिद्धी पाहून आता हळुहळु त्यांच्या कार्याची दखल मीडिया,NGO,आध्यात्मिक संस्था तसेच राज्य व केंद्र सरकार घेत आहेत.कित्येक देशभक्त,समाजसुधारक,अध्यात्मिक जाणीव असलेले लोक या कार्याच्या प्रचारासाठी पुढे येत आहेत.या कार्याच्या 100% सफलतेसाठी आणखी काही देशभक्त,सामाजिक जाणीव जपनार्या बांधवाची आवश्यकता आहे.
Saturday, 30 December 2017
सुभाष पाळेकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment