Saturday, 30 December 2017

सुभाष पाळेकर

सुभाष पाळेकर <br>
एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आपल्या परंपरागत शेतीच्या कामातून बाहेर पडून अधिकारी,मोठा राजकारणी,उद्योगपती झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो.पण गावातच राहून शेतावरच शेती विषयक संशोधन करून भारतभर लौकिक,प्रसिद्धी मिळवणारे एकमेव नाव म्हणजे सुभाष पाळेकर.सुभाष पाळेकर देशातील प्रत्येक भागात शिबिराच्या माध्यमातून पोहचले आहेत.अतिशय उदास व हालाखीच्या परिस्थितीत असलेला शेतकरी राजा सुद्धा आपली पूर्ण शक्ति लावून त्यांचे प्रयोग आपल्या शेती मध्ये करून पहात आहे.पाळेकर यांची प्रसिद्धी पाहून आता हळुहळु त्यांच्या कार्याची दखल मीडिया,NGO,आध्यात्मिक संस्था तसेच राज्य व केंद्र सरकार घेत आहेत.कित्येक देशभक्त,समाजसुधारक,अध्यात्मिक जाणीव असलेले लोक या कार्याच्या प्रचारासाठी पुढे येत आहेत.या कार्याच्या 100% सफलतेसाठी आणखी काही देशभक्त,सामाजिक जाणीव जपनार्या बांधवाची आवश्यकता आहे.

चला जंगलात फिरायला

चला आज आपण एका घनदाट जंगलात फिरायला जाऊ.कडक उन्हाळ्याच्या दिवसात जंगलामध्ये आपल्याला मोठ मोठी झाडं झुडपे वेली दिसत आहेत.वेगवेगळ्या प्रकारचे कीड़े मुंग्या प्राणी पक्षी आपल्याला दिसत आहेत.वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज आपल्या कानावर पडत आहेत.मानवी वस्तीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या जंगलात प्राणी पक्षी वेली झाडं अगदी आनंदात रहात आहेत.21 व्या शतकातही आपण मानवा पासून सुरक्षित आहोत याचा जणू ते आनंदच साजरा करतायत असं वाटत आहे.प्रत्येक झाडांची  आकार उंची प्रचंड मोठी आहे.मोठ मोठ्या झाडांच्या खाली असलेल्या झुडपावर पसरलेल्या फळांनी फुलांनी बहरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेली दिसत आहेत.कडक उन्हाळ्यात 8 महिन्यापासून एकही पावसाचा थेंब न पडलेल्या या जंगलात अगदी लहान लहान रोप सुद्धा जोमात वाढत आहेत.वेली,झाडं फळा फुलांनी गच्च भरलेली आहेत.चक्क 8 महिन्यापासून या जंगलात पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही असं अजिबातच वाटत नाही.हजारो वर्षापासून या जंगलांने कित्येक सतत 2-3 वर्षाचे दुष्काळ,पूर,चक्रीवादळ पाहिले आहेत तरीही हे जंगल आपले अस्तित्व टिकवून आहे.असल्या संकटातही येथील प्राणी पक्षी कीटक वेली झाडं झुडपे आपल्या जाती प्रजातीचे अस्तित्व टिकवून आहेत.लाखो ताकतवर प्राणी पक्षी आणि झाडामध्ये सुद्धा येथील छोटे छोटे कीटक प्राणी  पक्षी वेली वनस्पति आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत.मित्रांनो ....या जंगलात फिरताना आपल्याला खूप त्रास झाला पण मित्रांनो काळजी करू नका सरकार करोडो रुपये खर्च करून येथे लवकरच पर्यटन क्षेत्र विकसित करणार आहे .जेंव्हा आपण परत या सुंदर जंगलात येऊ तेंव्हा येथे चांगले रस्ते रेस्टॉरंट होटेल्स असतील आणि शहरातील हजारो लोकांना शुद्ध हवा आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद येथे घेता येईल.त्यातून रोजगार वृद्धि होईल आणि येथे शुध्द हवेत तुम्हाला तुमचं सुंदर घर देखील घेता येईल.फ़क्त या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्या खिशात भरपूर पैसे हवेत.

नैसर्गिक खेती - कविता

*नेचुरल फार्मिंग है वक्त की जरूरत।*
*अभी नहीं समझोगे तो होगी मुसीबत ॥*

*अब तक जो हमने किया वो थी अनजाने में की भूल ।*
*सब कुछ समझ कर भी जहर बांटोगे तो सजा मिलेगी भरपूर ॥*

*इसी तरह से जो जीव जल-जंगल-जमीन  को लुटाते जाओगे ।*
*आने वाली मुसीबतों को आधुनिक तकनीक से नहीं संभाल पाओगे ॥*

*आधुनिक विज्ञान को प्रकृति संवारने में ना लगाओगे।*
*भविष्य में तुम मिट कर रहे जाओगे ॥*

*क्या पढ़ लिख कर तू भी विज्ञान को प्रकृति के विनाश में लगाएगा ।*
*आने वाले पैसों से क्या साफ हवा-पानी खरीद पायेगा ॥*

*माना कि यह तेरे अकेले बस की बात नहीं।*
*प्रकृति के चाहने वालों से जुड़ जा फिर विनाशकारियों की कोई औकात नहीं ॥*

*प्रकृति को मिटाकर तुम क्या अपने बच्चों का हित कर पाओगे ।*
*क्या दौलत से तुम  स्वस्थ जीवन जंगल जमीन खरीद पाओगे ॥*

   🌱  #चलानैसर्गिकशेतीकडे  🌱

फायद्याची गव्हाची शेती-बन्सी गहू

सुवर्णसंधी,सुवर्णसंधी,सुवर्णसंधी

शेतकरी मित्रांनो,या रब्बी हंगामात बंसी जातीच्या गव्हाची पेरणी करा आणि लाखो रुपये कमवा.बंसी जातीच्या गव्हाला भरपूर मागणी आहे त्यामुळेच हा गहू 40 रुपयांपासून 100 रुपयापर्यंत विकला जातो.या गव्हाचे एकरी 12-18 क्विन्टल पर्यंत उत्पादन होते. 40 च्या दराने 15 क्विंटलचे 60000 रुपये होतात.गव्हाच्या चवीचे व औषधीय गुणांचे महत्व तुमचे आजी आजोबा सांगू शकतील.या गव्हाची पोळी 2-3 दिवस दसमी सारखी नरम रहाते.आणि या गव्हाच्या पोळीला भाजी नसतानाही फ़क्त पोळी खाऊनही स्वादिष्ट चव मिळते.बंसी गहू फ़क्त 3-5 पाण्यात येतो.हा गहू जोरदार वादळात खाली पडला तरी दुसऱ्या दिवशी परत उभा रहातो.याची ओम्बी छोटी व गच्च असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे हा गहू खराब होत नाही.
             दुसरीकडे रासायनिक गहू करने परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी गहू पिकवणे सोडून दिले आहे.फ़क्त घरी खाण्यासाठी शेतकरी गहू पिकवत आहे.तेंव्हा शेतकरी मित्रांनो या रब्बी हंगामात अर्धा एकर तरी नैसर्गिक बंसी गहू पिकवून पहा.कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका.पहिल्याच वर्षी नैसर्गिक शेतीत भरपूर उत्पादन मिळते.आणि हो ......कधी आपली भेट झाली तर वरण पोळी खाऊ घाला.😃😃

कीड येण्याची कारणे ?

शेतकरी मित्रांनो ,

सध्या शेतकऱ्यांसमोर असणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पिकांवर पडणारे रोग,कीड आहे.सध्याच्या रासायनिक शेती पद्धतीमुळे दिवसेंदिवस पिकांमधील प्रतिकार क्षमता कमी होत आहे.आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत आहे.आज शेतकरी कीड व रोगांसाठी वातावरणाला जबाबदार धरतो.पण याचे मूळ दुसऱ्याच गोष्टींमध्ये सामावलेले आहे.कीड व रोग येण्याची कारणे ------
1.बियाणे----
सर्वात महत्त्वाचे कीड व रोग येण्याचे कारण म्हणजे संकरित बियाणे आहे. संकरित बियाण्यांची निर्मिती शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर उद्योगांच्या हितासाठी करण्यात आली आहे.गावरान बियाणे हे स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणारे असते. गावरान बियाणे वादळ, कमी जास्त पाऊस ,कडक ऊन, थंडी अशा सर्वच वातावरणात टिकाव धरून राहते.
2. रासायनिक खते---
रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत जाते. जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे पिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात कीड येते.
3.कीटक नाशक --- मित्रांनो आपल्या शेतात निसर्गाची एक अद्भुत संरक्षक यंत्रणा आहे म्हणजे आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाने योजना तयार केली आहे. आपण अशी योजना जंगलामध्ये पाहू शकतो. जंगलात झाडे निरोगी व फळाफुलांनी बहरलेली दिसतात. तिथे तर कोणीही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली नाही.मग तेथील फळांवर रोग का आढळत नाही. याला कारण आहे तेथील मित्र कीटक, निसर्गात 80%  कीटक हे मांसाहारी आहेत म्हणजे ते शाकाहारी कीटकांना खातात. म्हणजे आपल्या पिकाला फक्त निसर्गातील 20% कीटक हानी पोहोचवतात व उरलेले 80% कीटक या शाकाहारी कीटकांना खातात.विशेष म्हणजे मांसाहारी कीटकांचे प्रमाण निसर्गात खूप जास्त आहे. आपण जेव्हा रासायनिक कीटकनाशक फवारतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर मित्र कीटक मारले जातात आणि निसर्गात असमतोल निर्माण होतो.यामुळे मोठ्या प्रमाणात शाकाहारी कीटकांची वाढ होते म्हणजे रासायनिक कीटकनाशकांमुळेच शेतांमधील किडींची संख्या वाढते.
4.पाणी ----
रासायनिक शेतीत पिकाला मुळी जवळ भरपूर पाणी दिले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोग येतात .
5.अंतर ---
अधिक उत्पन्न काढण्याच्या लालसेने व तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक शेतीत कमीत कमी जागेत जास्त झाडे लावली जातात यामुळे झाडाची वाढ व विकास व्यवस्थित होत नाही.झाडांना आवश्यक पोषक तत्त्व,सूर्यप्रकाश मिळत नाही.याउलट नैसर्गिक शेतीत रासायनिक शेतीपेक्षा दुप्पट ते तिप्पट अंतर जास्त ठेवले जाते व आतल्या जागेत आंतरपिके घेतली जातात.यामुळे पिकांना आवश्यक सूर्यप्रकाश,हवा,पाणी ,पोषकतत्त्व अगदी पुरेपूर मिळतात. अशी झाडे कुठल्याही परिस्थितीत निरोगी व मजबूतपणे टिकून रहातात.
6.एकपिक पद्धती ---
निसर्गात बरीचशी सापळा पिके कीटकांपासून झाडाचे रक्षण करतात.वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळे कीटक बसत असतात.आंतरपिकांमुळे काही ठराविक प्रकारचे कीटक आपण पिकावर येण्यापासून वाचवू शकतो.
           चिंतामुक्त,आत्महत्या मुक्त ,निरोगी जीवनाचा पर्याय म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेती हाच आहे .

नैसर्गिक ऊस उत्पादनाचे गणित

*नैसर्गिक ऊस उत्पादनाचे गणित*

33×33 म्हणजे एक गुंठा,40 गुंठ्याचा एक एक्कर
33×33×40=43560 स्क्वेअर फूट म्हणजे एक एक्कर
आता 43560 स्क्वेअर फूट म्हणजे एक एक्कर.

आता जर आपण 8×2 वर एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड केली तर
एका एकरात 43560÷16=2722
*म्हणजे एका एकरात 2722 रोपांची लागवड होईल.*

प्रत्येक डोळ्याला जर सरासरी 15 फुटवे फुटले तर
2722×15=40830
*म्हणजे एका एकरात एकूण 40830 ऊस होतील.*

*जर प्रत्येक ऊस 2 किलोचा धरला तर*
40830×2=81660
म्हणजे एका एकरात आपल्याला 81660 किलो उसाचे उत्पादन होईल. *म्हणजे एका एकरात 80 टन ऊसाचे उत्पादन होईल.*

         आणि या गोष्टी सहज शक्य आहेत.
*आंतरपिकांचे भरपूर उत्पादन आणि एकरी 80 टन उत्पादन म्हणजे पैसाच पैसा होईल.*

https://youtu.be/1KzyTmINriQ

युवकांनो तुम्हाला शास्त्रज्ञ बनण्याची संधी

युवकांनो तुम्हाला शास्त्रज्ञ बनण्याची संधी देत आहे,झिरो बजेट नैसर्गिक शेती.
यात तुम्ही स्वतःची बियाणे,
स्वतःचे औषधे कीटकनाशके,
स्वतःच्या पद्धती विकसित करू शकता.
तुमचे स्वतः चे  मार्केट आणि
तुमचे स्वतःचे ग्राहक असतील
यात जिज्ञासा असेल,उत्सुकता असेल
नवनिर्मितीचा आनंद असेल
यात पैसा आहे,प्रसिद्धी आहे
गती आहे,वाढ आहे आणि विकास आहे.
यात स्वतः च्या ज्ञानाचा आणि तारुण्याच्या शक्तीचा जगाला परिचय करून देण्याची संधी आहे.
किती दिवस कंपन्यांच्या फायद्यासाठी शेती कराल ?
स्वतः च्या किरकोळ फायद्यासाठी आणखी किती दिवस आपली जमीन,लोकांचे आरोग्य,पर्यावरण जाणीव पूर्वक खराब कराल ?
नैसर्गिक शेती पद्धतीने तुम्ही मिळवलेला पैसा,प्रसिद्धी आसुरी नसेल तर सात्त्विक असेल यात पूर्ण जगाचे कल्याण असेल.
#चलानैसर्गिकशेतीकडे

तेल का खेल

तेल का खेल

अवघ्या 30-35 वर्षाखाली खायचे तेल उत्पादनात भारत स्वावलंबी होता.आज भारत 40 ते 50%  तेल आयात करतो.35 वर्षाखाली प्रत्येक गाव तेल उत्पादनात स्वावलंबी होते.आपल्या आजोबाच्या काळात करडी,तीळ,मोहरी,शेंगदाणे यांपासून गावातच तेल काढले जायचे.लोकांना स्वस्त,शुद्ध ,ताजे,भेसळमुक्त तेल खायला मिळायचे आणि गायी,बैलांना चोथ्यापासून पेंड बनवली जायची.पण आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे.आता तेल बियांच्या नावाखाली फक्त सोयाबीन पिकवले जाते.हानिकारक केमिकल रिफायन सोयाबीन तेल आरोग्याला चांगले असल्याचा खोटा प्रचार मोठया प्रमाणात करण्यात आला.आपले घण्यापासून तयार होणारे तेल आरोग्यास हानिकारक असल्याचा खोटा प्रचार करण्यात आला.आज सोयाबीनचा दर 2400 रु प्रति क्विंटल आहे.पण शेतकऱ्यांना आता सोयाबीन पेरण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही.आज लाखो टन हानिकारक पाम ऑइल विदेशातून आयात केले जाते.अजूनही वेळ गेलेली नाही.या रब्बी हंगामात करडी लागवड करून त्यापासून शुद्ध घण्याचे तेल आपण काढून आणू शकतो.करडी पासून

करडई पीकच का घ्यावे?

करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे तीन फुटांपेक्षा जास्त खोलीतील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात. त्यामुळे अवर्षणप्रवण परिस्थितीत कमी पावसाच्या वेळेस या पिकापासून हमखास उत्पादन मिळते. या पिकाच्या पानांचा आकार पूर्ण वाढीनंतर कमी होऊन कडेने काटे येतात. त्यामुळे झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन अवर्षणात चांगल्या प्रकारे तग धरुन राहते. पानांवर मेणचटपणा असल्यामुळे देखील बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे करडई हे पीक दुष्काळी विभागासाठी वरदानच ठरते.
करडई पिकास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पाण्याची गरज भासत नाही. परंतु टंचाईच्या काळात पिकास एक ते दोन पाण्याची आवश्यकता असते, परंतु गव्हाचा विचार केल्यास त्यास पाच-सहा पाणी लागतात. म्हणजेच एक एकर गव्हाऐवजी आपण दोन-तीन एकर करडई झाल्या पीक घेऊ शकतो आणि त्यापासून जास्त फायदा घेता येतो.  तसेच वारंवार गहूपीक घेतल्यामुळे जमिनीच्या वरच्या  थरातील अन्नद्रव्ये वापरली जातात. अशा ठिकाणी थरातील अन्नद्रव्याचा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल आणि अधिक फायदा होईल खरीप पिकानंतर रब्बी हंगामात दुसरे पीक घ्यायचे असेल आणि ओलावा ठराविक प्रमाणात असेल तर करडई हे एक उत्तम पर्याय आहे .

रासायनिक खत कशासाठी ?

प्रत्येक वनस्पती ही
76% पाणी,
23% सूर्यप्रकाश व कर्बआम्लवायू CO2
1% जमीन तत्त्वापासून बनलेल्या असतात.

यातील पाणी,सूर्यप्रकाश,CO2 या गोष्टी निसर्ग आपल्याला फुकटात देतो.म्हणजे 98.85% भाग हा निसर्ग आपल्याला फुकटात उपलब्ध करून देतो.ही कृषी विद्यापीठ ना पाणी बनवतात,ना कार्बनडाय ऑक्सार्ईड बनवतात,ना पिकांना सूर्यप्रकाश देतात.राहिला प्रश्न 1.25% भागाचा जो जमिनीतून पिकांना मिळतो.बरं यातील सर्वात मोठा हिस्सा 0.75% नायट्रोजन आहे.जो वातावरणात 78% उपलब्ध आहे.
पुन्हा
0.095% स्फुरद,
0.19% पालाश,
0.22% इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये
         
         मग ही भरपूर उत्पादन काढण्याचा अहंकार बाळगणारी कृषी विद्यापीठं नेमका कश्याचा अहंकार बाळगतात ?

स्वावलंबी गावासाठी आपली भूमिका ?

राजकारण सोडून समाजासाठी,स्वतः साठी आपण खूप काही चांगले,सकारात्मक करू शकतो.

स्वावलंबन,
लघू उद्योग,
प्रक्रिया उदयोग,
जीवनोपयोगी मूल्यंधारीत शिक्षण,
खेळ,
स्वावलंबी कृषी पद्धती,
जल व्यवस्थापन,
व्यसनमुक्ती,
स्वच्छता,
पर्यावरण,
कचरा व्यवस्थापन,
योग,
आयुर्वेद,
ध्यान पद्धती,
बायोगॅस,
सोलार,
इथेनॉल,

यासारख्या अनेक मुद्द्यांवर आपण काम करायला हवं.यातील प्रत्येक मुद्दा हा मानवी जीवन चांगले बनवण्यासाठी योगदान देऊ शकतो.पण या मुद्द्यांचा विचार राजकारण सोडल्याशिवाय होणार नाही.वरील मुद्दे स्थानिक लोकांच्या मदतीने नक्की साध्य करता येतात.यासारखी कामे पूर्ण करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष समर्थ नाही.आणि यासारख्या लोकोपयोगी सामाजिक कार्यांना रोखण्याची हिम्मत कुठल्याही राजकीय पक्षात नाही.तेंव्हा राजकारण सोडून आपण एखादया समाज उपयोगी मुद्द्यावर अभ्यास करावा.ते व्यवहारात कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करावेत .

हवा प्रदूषणावर उपाय ?

नैसर्गिक शेती करणारा शेतकरी शेतातील एकही काडी जाळत नाही.

*तर दुसरीकडे पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या काडी कचरा ( परोली ) जाळण्यामुळे दिल्लीमध्ये भयंकर प्रदूषण होत आहे.अशी पर्यावरणाला,सजीव सृष्टीला हानिकारक शेती पद्धती योग्य की अयोग्य ? यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. *एकट्या पंजाबच्या शेतकऱ्यांना पराली जाळण्यापासून थांबवण्यासाठी सरकारला 4000 कोटी रुपये लागणार आहेत.*

यावरून समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते.रासायनिक शेतीचा प्रचार करणाऱ्या दलाल कृषी विद्यापिठाणी या परालीचे महत्त्व कधी शेतकऱ्यांना सांगितलेच नाही.पाळेकर गुरुजींनी या काडी कचऱ्याला आपल्या भूमातेच्या साडीची उपमा दिली आहे.ऊन,वारा,पाऊस यांपासून जमिनीचे, गांडूळ व जिवाणूंचे रक्षण करून जमिनीला ताकत देण्याचे काम काडी कचरा ( आच्छादन ) करते. नैसर्गिक शेती करणारा शेतकरी हजारो रुपयांच्या रासायनिक खतांना पर्यायी खत म्हणून याकडे पाहतो.या बदमाश कृषी विद्यापीठाणा आता लक्षात आले आहे की,

*आत्ता पर्येंत आपली शेती पिकली ती रासायनिक खतांमुळे नव्हे*

तर वर्षानुवर्षे आपल्या पूर्वजांनी जमिनीत साठवलेल्या सेंद्रीय कर्बामुळे.आज हा सेंद्रिय कर्ब 0.3 पेक्षाही कमी झाला आहे.आपल्या जमिनी वेगाने नापीक होत आहे.शेतकऱ्यांना समृद्ध व देशाला प्रदूषण मुक्त स्वावलंबी व निरोगी बनवण्याचे काम फक्त झिरो बजेट नैसर्गिक शेती करू शकते.

#चलानैसर्गिकशेतीकडे

निसर्ग उभारायचा असेल तर ?

नैसर्गिक ऊस शेतीची चमत्कारिक वैशिष्ट्ये

*नैसर्गिक ऊस शेतीची चमत्कारिक वैशिष्ट्य -*

1.झिरो बजेट नैसर्गिक शेतीत उसाची कमीत कमी  8×2 फूट अंतरावर लागवड केली जाते.
2.एका एकरात फक्त 2722 डोळे लागतात.म्हणजे फक्त 200 उसामध्ये 1 एक्करची लागवड पूर्ण होते. *म्हणजे बेण्याचा खर्च फक्त 1200 रुपये होतो.*
3.लागवडीसाठी मजुरांचा खर्च 25% होईल.
4.फक्त 20% पाणी लागेल.
5.प्रत्येक ऊस 2 किलोपेक्षा जास्त वजनाचा असेल.
6.मुळ्यांची वाढ 4 फूट खोल व लांब होते.म्हणजे उसात जास्त दमदारपणा.
7. *उसाची उंची 15 ते 20 फुटांपर्यंत जाते.*
8.प्रत्येक डोळ्याला 15 पेक्षा जास्त फुटवे.
*9.एकदा लागवड केल्यानंतर 1000 वर्षापर्यंत खोडवा घेता येतो.*
10.आंतरपिकांतून ऊसाचा संपूर्ण खर्च वसूल होतो.
*11.अगदी प्रतिकूल परिस्थितीतही एकरी 40 ते 80 टनाचे उत्पादन.*
*12.ना रासायनिक खत,ना गांडूळ खत,ना शेणखत,ना कंपोस्ट खत फक्त जीवामृत व घनजीवामृत वापर .*
13.कुठल्याही परिस्थितीत ऊस पडत नाही.
14.कुठलीही कीड व रोग येत नाही.
15.जमिनीच्या सुपिकतेत वाढ होते.
16.कुठल्याही प्रकारची मशागत न करताही गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत रहाते.

तर मित्रांनो,

#चलानैसर्गिकशेतीकडे

रासायनिक शेतीची वैशिष्ट्य

*रासायनिक शेतीची वैशिष्ट्य -*

🌱खर्चिक
🌱विषारी
🌱पाणी प्रदूषित करणारी
🌱हवेचे प्रदूषण
🌱नापीक जमीन
🌱शेतकऱ्यांचे कर्ज वाढवणारी
🌱कर्जातून आत्महत्या
🌱गांडूळ नष्ट करणारी
🌱उपयुक्त जिवाणू संपावणारी
🌱बेभरवशाची
🌱नैसर्गिक आपत्तीत जास्त नुकसान
🌱भाव पडल्यास खर्चही निघणे अवघड
🌱किडी व रोगांमध्ये वाढ
🌱चव,स्वाद व पोषकता घालवणारी
🌱भारताची आयात वाढवणारी
🌱झाड़े,पशु,पक्षी,कीटक नष्ट करणारी
🌱शेतीची उत्पादकता घटवणारी
🌱आंतरपीक पद्धती नष्ट करणारी
🌱भाज्या फळे धान्य तेल यातील विविधता नष्ट करणारी 🌱पाणी,वीज,वाहतूक,शहरीकरण,बेरोजगारी वाढवणारी
🌱संपत्तीचे केंद्रीकरण करणारी
🌱निसर्गाचे शोषण करणारी
🌱महागाई वाढवणारी
🌱ग्रामीण उद्योग,लघु उद्योग नष्ट करणारी
🌱नैसर्गिक संकटाचा सामना न करू शकणारी
🌱शेतकऱ्यांना ग्राहकांना फसवून लूट करणारी

*रासायनिक शेतीचे कट्टर समर्थन करणाराही वरील मुद्द्यांशी सहमत असेल असे मला वाटते.रासायनिक शेतीच्या समर्थनासाठी फक्त एक मुद्दा मांडला जातो तो म्हणजे उत्पादन जास्त मिळते.जो चुकीचा आहे.नैसर्गिक शेतीत आतरपिकांच्या माध्यामातून दुप्पट तिप्पट उत्पन्न काढता येते.जे रासायनिक शेतीत शक्य नाही.तेंव्हा मित्रांनो.......*

#चलानैसर्गिकशेतीकडे

नैसर्गिक शेती पसरत का नाही ?

*खूप सारे लोक म्हणतात की नैसर्गिक शेती इतकी चांगली आहे तर मग ती गतीने पसरत का नाही ?*

1.गावरान गायींची कमतरता असल्यामुळे ही शेती पसरायला वेळ लागत आहे.पाळेकर गुरुजींच्या म्हणण्यानुसार सकाळी 5 वाजता उठून आपण डायरेक्ट गोमूत्र पकडून ही गरज पूर्ण करू शकतो.पण सकाळी उठून गोमूत्र पकडण्याची तयारी फार थोड्या शेतकऱ्यांची असते.व्यवस्थित गोठा करून नालीने गोमूत्र जमा करण्यासाठी 3 ते 4 गायी व बैलजोडी लागते.यावर पर्याय म्हणजे बरेचसे शेतकरी गोशाळेतून गोमूत्र आणतात व नैसर्गिक शेती करतात.
2.नैसर्गिक शेतीत पहिल्याच वर्षी उत्पन्न रासायनिक शेती इतकेच किंवा त्यापेक्षा जास्त येते,असे असले तरी सर्वच शेतकरी मजूर,रोपे,बियाणे,वेळ,गोमूत्र  उपलब्ध नसल्यामुळे आंतरपीक,आच्छादन, वापसा,सहजीवन, जीवामृत,घनजीवामृत,योग्य बिवड यासारख्या गोष्टींमध्ये कमी पडतात.परिणामी पहिल्या वर्षी उत्पादन 20 ते 30 ℅ घटू शकते.
3.ग्राहक नैसर्गिक शेतमालाला दुप्पट किंमत देत असले तरी सर्वच ग्राहक गावरान, विषमुक्त,चवदार,पौष्टिक या गोष्टींना महत्त्व देत नाहीत.बरेच ग्राहक व सर्वच व्यापारी आकार,रंग,आकर्षकपणा पाहून शेतमाल खरेदी करतात.अशी व्यवस्थाच तयार करण्यात आली आहे.नैसर्गिक शेतमाल निर्यात करतानाही या अडचणी येतात.
4.सरकार सेंद्रिय शेतीसाठी बियाणे, औषधे, गांडूळ खत,कंपोस्ट खत यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान व प्रोत्साहन देत आहे.यासाठी प्रत्येक शहरात ATMA अंतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन,जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत.ब्रँडिंग, मार्केटिंग, प्रमाणीकरण यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत.तरीही सेंद्रीय शेती पछाडून भरारी हीच एक गोष्ट नैसर्गिक शेतीची ताकद दर्शवते.आणि रासायनिक शेतीसाठी तर हजारो करोड रुपये खर्च होतच आहेत.
5.अपुरी प्रचार प्रसाराची साधने हे नैसर्गिक शेती न पसरण्याचे महत्त्वाचे कारण आहे.सरकार,कृषी विद्यापीठे, कंपन्या,मीडिया यांना नैसर्गिक शेतीच्या प्रचारातून काहीही फायदा दिसत नाही.त्यामुळे देशभरात 50 लाख शेतकऱ्यांनी ही कृषी पद्धती स्वीकारली असतानाही अजूनही या कृषी पद्धतीवर सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही.या शेती पद्धतीला पसरवण्याचे काम पूर्णतः मोठ्या स्वरूपात पाळेकर गुरुजींच्या शिबिरातून होते.कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता गुरुजींच्या शिबिरांना हजारो शेतकरी उपस्थित रहातात. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले नैसर्गिक शेती करणारे शेतकरी हळूहळू शेती पद्धती पसरवत आहेत.कित्येक सुशिक्षित,पर्यावरण प्रेमी,आरोग्या विषयी जागरूक लोक,साधूसंत,शेतकरी संघटन,समाजवादी,NGO व राजकीय लोकही आता या शेती पद्धतीचे महत्त्व समजून नैसर्गिक शेतीच्या प्रचाराचे काम करत आहेत.

तर मित्रांनो येत्या काळात नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही.तेंव्हा काळाची व परिस्थितीची गरज लक्षात घेऊन आजच नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू करा .
#चलानैसर्गिकशेतीकडे