Saturday, 30 December 2017

स्वावलंबी गावासाठी आपली भूमिका ?

राजकारण सोडून समाजासाठी,स्वतः साठी आपण खूप काही चांगले,सकारात्मक करू शकतो.

स्वावलंबन,
लघू उद्योग,
प्रक्रिया उदयोग,
जीवनोपयोगी मूल्यंधारीत शिक्षण,
खेळ,
स्वावलंबी कृषी पद्धती,
जल व्यवस्थापन,
व्यसनमुक्ती,
स्वच्छता,
पर्यावरण,
कचरा व्यवस्थापन,
योग,
आयुर्वेद,
ध्यान पद्धती,
बायोगॅस,
सोलार,
इथेनॉल,

यासारख्या अनेक मुद्द्यांवर आपण काम करायला हवं.यातील प्रत्येक मुद्दा हा मानवी जीवन चांगले बनवण्यासाठी योगदान देऊ शकतो.पण या मुद्द्यांचा विचार राजकारण सोडल्याशिवाय होणार नाही.वरील मुद्दे स्थानिक लोकांच्या मदतीने नक्की साध्य करता येतात.यासारखी कामे पूर्ण करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष समर्थ नाही.आणि यासारख्या लोकोपयोगी सामाजिक कार्यांना रोखण्याची हिम्मत कुठल्याही राजकीय पक्षात नाही.तेंव्हा राजकारण सोडून आपण एखादया समाज उपयोगी मुद्द्यावर अभ्यास करावा.ते व्यवहारात कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करावेत .

No comments: