Saturday, 30 December 2017

तेल का खेल

तेल का खेल

अवघ्या 30-35 वर्षाखाली खायचे तेल उत्पादनात भारत स्वावलंबी होता.आज भारत 40 ते 50%  तेल आयात करतो.35 वर्षाखाली प्रत्येक गाव तेल उत्पादनात स्वावलंबी होते.आपल्या आजोबाच्या काळात करडी,तीळ,मोहरी,शेंगदाणे यांपासून गावातच तेल काढले जायचे.लोकांना स्वस्त,शुद्ध ,ताजे,भेसळमुक्त तेल खायला मिळायचे आणि गायी,बैलांना चोथ्यापासून पेंड बनवली जायची.पण आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे.आता तेल बियांच्या नावाखाली फक्त सोयाबीन पिकवले जाते.हानिकारक केमिकल रिफायन सोयाबीन तेल आरोग्याला चांगले असल्याचा खोटा प्रचार मोठया प्रमाणात करण्यात आला.आपले घण्यापासून तयार होणारे तेल आरोग्यास हानिकारक असल्याचा खोटा प्रचार करण्यात आला.आज सोयाबीनचा दर 2400 रु प्रति क्विंटल आहे.पण शेतकऱ्यांना आता सोयाबीन पेरण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही.आज लाखो टन हानिकारक पाम ऑइल विदेशातून आयात केले जाते.अजूनही वेळ गेलेली नाही.या रब्बी हंगामात करडी लागवड करून त्यापासून शुद्ध घण्याचे तेल आपण काढून आणू शकतो.करडी पासून

करडई पीकच का घ्यावे?

करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे तीन फुटांपेक्षा जास्त खोलीतील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात. त्यामुळे अवर्षणप्रवण परिस्थितीत कमी पावसाच्या वेळेस या पिकापासून हमखास उत्पादन मिळते. या पिकाच्या पानांचा आकार पूर्ण वाढीनंतर कमी होऊन कडेने काटे येतात. त्यामुळे झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन अवर्षणात चांगल्या प्रकारे तग धरुन राहते. पानांवर मेणचटपणा असल्यामुळे देखील बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे करडई हे पीक दुष्काळी विभागासाठी वरदानच ठरते.
करडई पिकास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पाण्याची गरज भासत नाही. परंतु टंचाईच्या काळात पिकास एक ते दोन पाण्याची आवश्यकता असते, परंतु गव्हाचा विचार केल्यास त्यास पाच-सहा पाणी लागतात. म्हणजेच एक एकर गव्हाऐवजी आपण दोन-तीन एकर करडई झाल्या पीक घेऊ शकतो आणि त्यापासून जास्त फायदा घेता येतो.  तसेच वारंवार गहूपीक घेतल्यामुळे जमिनीच्या वरच्या  थरातील अन्नद्रव्ये वापरली जातात. अशा ठिकाणी थरातील अन्नद्रव्याचा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल आणि अधिक फायदा होईल खरीप पिकानंतर रब्बी हंगामात दुसरे पीक घ्यायचे असेल आणि ओलावा ठराविक प्रमाणात असेल तर करडई हे एक उत्तम पर्याय आहे .

No comments: