नैसर्गिक शेती करणारा शेतकरी शेतातील एकही काडी जाळत नाही.
*तर दुसरीकडे पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या काडी कचरा ( परोली ) जाळण्यामुळे दिल्लीमध्ये भयंकर प्रदूषण होत आहे.अशी पर्यावरणाला,सजीव सृष्टीला हानिकारक शेती पद्धती योग्य की अयोग्य ? यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. *एकट्या पंजाबच्या शेतकऱ्यांना पराली जाळण्यापासून थांबवण्यासाठी सरकारला 4000 कोटी रुपये लागणार आहेत.*
यावरून समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते.रासायनिक शेतीचा प्रचार करणाऱ्या दलाल कृषी विद्यापिठाणी या परालीचे महत्त्व कधी शेतकऱ्यांना सांगितलेच नाही.पाळेकर गुरुजींनी या काडी कचऱ्याला आपल्या भूमातेच्या साडीची उपमा दिली आहे.ऊन,वारा,पाऊस यांपासून जमिनीचे, गांडूळ व जिवाणूंचे रक्षण करून जमिनीला ताकत देण्याचे काम काडी कचरा ( आच्छादन ) करते. नैसर्गिक शेती करणारा शेतकरी हजारो रुपयांच्या रासायनिक खतांना पर्यायी खत म्हणून याकडे पाहतो.या बदमाश कृषी विद्यापीठाणा आता लक्षात आले आहे की,
*आत्ता पर्येंत आपली शेती पिकली ती रासायनिक खतांमुळे नव्हे*
तर वर्षानुवर्षे आपल्या पूर्वजांनी जमिनीत साठवलेल्या सेंद्रीय कर्बामुळे.आज हा सेंद्रिय कर्ब 0.3 पेक्षाही कमी झाला आहे.आपल्या जमिनी वेगाने नापीक होत आहे.शेतकऱ्यांना समृद्ध व देशाला प्रदूषण मुक्त स्वावलंबी व निरोगी बनवण्याचे काम फक्त झिरो बजेट नैसर्गिक शेती करू शकते.
#चलानैसर्गिकशेतीकडे
No comments:
Post a Comment