रासायनिक शेती ही मटक्यासारखी आहे.जी उत्पन्नाच्या आशेने आपल्याकडून भरपूर गुंतवणूक करून घेते. पण मटका जसा कधीच लागत नाही तसे रासायनिक शेतीतही इच्छित उत्पन्न कधीच मिळत नाही.रासायनिक शेतीची सुरुवात पंजाब राज्यातून झाली.30-40 वर्षांपूर्व एकही रुपाया खर्च न करता भरपूर उत्पादन काढणारा पंजाबचा शेतकरी,आज लाखो रुपये खर्च करत आहे.शेतीवरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि उत्पादन घटत चालले आहे. पंजाब सारख्या राज्यात जेथे 98% जमीन सिंचनाखाली आहे.पंजाब मधील हेक्टरी उत्पादन सुद्धा जागतिक दर्जाचे आहे.तरीसुद्धा पंजाब मधील शेतकरी भारतात सर्वात जास्त कर्जबाजारी आहेत.पंजाब मध्ये सरासरी 41500 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांवर कर्ज आहे.आज पंजाबचे शेतकरी मोठया प्रमाणात आत्महत्या करत आहेत.सुपीक,संपन्न पंजाबला कर्ज, आत्महत्या,कँसर,बंजर जमीन या गोष्टी रासायनिक शेतीनेच दिल्या.
#चलानैसर्गिकशेतीकडे
No comments:
Post a Comment