Saturday, 30 December 2017

युवा शेतकरी आणि रासायनिक शेती

*युवा शेतकरी आणि रासायनिक शेती*

युवा शेतकरी जेंव्हा शेती करायला सुरुवात करतात तेंव्हा प्रचंड उत्साह आणि भरपूर उत्पन्नाची अपेक्षा घेऊन येतात.म्हाताऱ्या लोकांच्या व्यावहारिक गणितापेक्षा त्यांच्या महात्त्वाकांशा खूप मोठया असतात.आधुनिक पद्धतीचा वापर करून आपण आपल्या शिवारातील सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे रेकॉर्ड मोडून काडायचे ही जिद्द घेऊन जेंव्हा हे तरुण कामाला लागतात.तेंव्हा कृषी विद्यापीठाच्या सांगण्यानुसार भरपूर उत्पादन देणाऱ्या नवनवीन प्रकारच्या बागायती पिकांची लागवड करतात.पूर्ण पैसा, वेळ,श्रम देऊन ते 3 ते 4 वर्ष आपल्या बागेची काळजी घेतात. बागेसाठी ते  शेणखत,ठिबक,शेततळं,मशागत,रासायनिक खतांचे डोस,संकरित बियाणे,जैविक खतं,जैविक कीटकनाशके, संजीवके,बीजप्रक्रिया,शेणखत,कंपोस्ट खत,गांडूळ खत,तणनाशके असा सगळा खर्च करतात.हे तरुण शेतकरी अधिक उत्पन्नच्या आशेतून भरपूर रासायनिक खत व कीटकनाशक फवारण्या करतात.हे सगळं करण्यासाठी लाखो रूपायाचं कर्जही काढतात.आणि मग पुढे काय ? 3 ते 4 वर्ष मुलासारखी जोपासलेल्या बागेत अचानक वादळ,दुष्काळ,किडी,रोग,वीज,पाणी यामुळे उत्पन्न घटते आणि उत्पन्न भरपूर झालेच तर मग बाजारभाव गडगडतो.या सगळ्या संकटात शेतकरी दरवर्षी अडकतो आणि कर्जाचा डोंगर वाढतच जातो.या सर्व दुष्ट चक्रामुळेच शेतकरी शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडतो.

#चलानैसर्गिकशेतीकडे

No comments: